Tuesday, April 5, 2011

पुन्हा अघळ पघळ..

आज इतर ब्लॉग वाचत असताना अचानक मला माझ्याच प्रोफाइल मधला हा जुना ब्लॉग दिसला. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2009 ची अघळ पघळ दैनंदिनी - अघळ पघळ अशासाठी की हा काही साहित्यिक अथवा उपमा-अलंकारांनी सुशोभित केलेला ब्लॉग नाही - ही आहे एक साधी सुधी दैनंदिनी. फक्त इतिहासात घेऊन जाण्यासाठी.. मला आठवतंय 2008-2009 मध्ये जेव्हा मे अमेरिकेत नवीन होतो तेव्हा एकडच्या बर्‍याच गोष्टींचे खूप कुतूहल वाटायचं. म्हणून म्हटलं लिहुया काय कसं वाटतंय ते - भविष्यात वाचून छान वाटेल.. आणि आज अगदी तसाच झालं! एकदम 2 वर्ष मागे जायला झालं. पुन्हा अधिक तरुण होण्याचा हा बहुदा एकच मार्ग असावा!

गेल्या 2 वर्षात खूप काही बरं-वाईट घडलं.. बरीच जवळची माणसं कायमची सोडून गेली.. काहींशी वाद झाले.. पण त्याचबरोबर दोनचे चार हातही झाले - माझी आद्य मैत्रीण कायमची माझी झाली, कामातही प्रगती झाली.. आणि इतरही बरच काही! पण ह्या सगळ्याची फक्त गोळाबेरीजच आता शिल्लक आहे.. त्या क्षणीच्या भावना नाही पुन्हा निर्माण करता येत.. पण 2009 मार्च च्या भावना मात्र आज पुन्हा जागृत झाल्या - केवळ या दैनंदिनी मुळे.. म्हणून आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पुन्हा एकदा ही दैनंदिनी लिहावी असा विचार करतोय - निश्चय नाही म्हणत मी - कारण तो झाला होता 2009 मधेच करून, आणि त्याचा 3 महिन्यातच बोर्‍याही वाजला होता.. म्हणून ह्यावेळी फक्त विचार!

असो - तर मग परत सुरू करतोय लिखाण.. बघू जोपर्यंत जमेल तोपर्यंत!

No comments:

Post a Comment